इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

मैत्री विभाग

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, ऐरोली शाखेत नोव्हेंबर २००४ मध्ये खास महिलांसाठी मैत्री विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप – वेगवेगळ्या विषयांची व्याखाने, प्रेरणादायी पुरस्कार देणे, विविध कलागुणांची शिकवण देणार्या कार्यशाळा, लहान मुलांसाठी संस्कार शिबीर, प्रेरणादायी व विविध विषयांच्या मुलाखती, ग्राहक पेठ आणि महिलांसाठी विविध स्पर्धा अशा प्रकारचे आहे. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी सायंकाळी ४ ते ६ य वेळेत मैत्रीचे हे कार्यक्रम अव्याहतपणे उत्साहाने चालू आहेत.

मैत्रीचा उद्देश विविध स्तरातील स्त्रियांचे सामाजिक, वैचारिक, आर्थिक राजकीय आरोग्य याचे प्रबोधन करून त्यांना आपल्या कला गुणांच्या अभिव्यक्ती साठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा आहे.

vardhapan-din1

वर्धापन दिन
मैत्री विभागाला २२ वर्षे पूर्ण झाले असून दरवर्षी वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. १ डिसेंबर २००७ रोजी ३ -या वर्धापन दिना निमित्त शुभांगी गोखले या उपस्थित होत्या.

वर्धापन दिन
मैत्रीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त “वाजे सनई चौघडे” “लग्न” ह्या संकल्पनेवर विविध स्पर्धा तसेच उखाणा विथ रॅम्प वॉक व सोलो नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, “यंदा कर्तव्य आहे” हा “लग्न” हया संस्काराकडे कालानुरूप, सुसंगत, नविन दृष्टी देणाऱ्या गप्पा, खुसखुशीत, अनुभवसंपन्न, वास्तवदर्शी, प्रबोधनात्मक गप्पांची बैठक ५० वर्षे विश्वासनीय अनुरूप विवाहसंस्थेच्या संचालिका डॉ. गौरी कानिटकर यांनी खूप छान जमवली.

vardhapan-din3
vardhapan-din2

वर्धापन दिन
मैत्रीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाक-कलेचे आयोजन केले होते त्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मधुरा बाचल यांना बोलवण्यात आले.

ग्राहक पेठ

मैत्री विभागातर्फे महिलांना व्यवसायिक व्यासपीठ देण्याच्या उद्देश्याने ग्राहक पेठ ची
संकल्पना जोपासण्यात आली आणि गेली काही वर्षे आपण ग्राहक पेठेचे यशस्वीपणे
आयोजन करतो. अशाच काही ग्राहक पेठेची क्षणचित्रे

पिकनिक

दिवाळी मध्ये घराची साफसफाई, फराळ बनवणे, पाहुण्यांची उठबस, पूजा-रांगोळी ह्या सगळ्या
धावपळीत महिलांना शारीरिक आणि मानसिक थकवा येणारच आहे. सणासुदीला महिला सगळ
उत्साहात पार पाडतात आणि नंतर गरज वाटते थोड RELAX होण्याची म्हणूनच खास महिलांसाठी
विरंगुळा म्हणून मैत्री विभागातर्फे एक दिवसीय सहल आयोजित करण्यात येते.
दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी विष्णू बाग येथे एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती.

संस्कार शिबीर

मैत्री विभागाचा अजून एक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे – संस्कार शिबीर
दरवर्षी ८ ते १४ वयोगटातील मुलामुलींसाठी संस्कार शिबीर आयोजित केले जाते. उन्हाळ्याच्या सुट्टी
मध्ये मुलांना विरंगुळा म्हणून तसेच मुलांमध्ये गोष्टींमधूनच, खेळ, बोध,विविध विषयांची माहिती व
जीवनाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने शिबिराचे आयोजन केले जाते. अश्याच संस्कार शिबीर निमित्त
उद्घाटनाला श्रीमती. विजया वाड या उपस्थित होत्या .

सिंधू ताई सपकाळ २०१०

महाराष्ट्र सेवा संघ ऐरोली मैत्री विभागातर्फे ६ व्या वर्धापन दिनानिम्मित सुप्रसिद्ध अभिनेत्री “इला भाटे” यांचे “जीवनातील नाट्य व नाट्यातील जीवन” या विषयावर आत्मकथन. तसेच थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची सुसंवादिनी समीरा गुजर यांनी “मी सिंधुताई सपकाळ” या विषयावर प्रकट मुलाखत घेतली.